दि. ९ जुलै

 

इंदापूर : तुम्ही सर्वजण शेतकरी कुटूंबातील असल्याने तुम्हाला सामान्य जनतेच्या प्रश्नांची निश्चितपणे जाणीव असेल,त्यामुळे तुमच्या हातून गोर-गरिबांची सेवा घडावी,आशी अपेक्षा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्ती केली.

 महाराष्ट्र लोक लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा नुकताच निकाल लागला असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज भरणेवाडी ता.इंदापूर येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून घवघवीत यश संपादन केले आहे,याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेके आहे.यातील अनेकांनी कोणत्याही बाह्य शिकवण्या न लावता घरच्या घरीच अभ्यास करून गुणवत्ता यादीमध्ये नाव झळकवलेले आहे,हे निश्चितपणे कौतुकास पात्र असून आपण सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने आज त्याचा फायदा असंख्य होतकरू विद्यार्थ्यांना होत असल्याने याचे खूप मोठे समाधान वाटत असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.तसेच तुमच्या या यशामध्ये आई-वडील,शिक्षक,गुरुजनवर्गासह समाज्याचाही मोलाचा वाटा आहे, याची जाणीव सदैव मनामध्ये ठेवून तुम्ही ज्या खुर्चीवर बसणार आहात, त्या खुर्चीचा वापर गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कराल ही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पदी यश संपादन केलेल्या ज्योती शिंदे (काटी),अभिजीत ढेरे (पळसदेव),करिष्मा वणवे (तावशी), अजयसिंह भाळे(खोरोची),अक्षय शिंदे (बोरी)आणि रणधीर रोकडे (निरवांगी) या गुणवंतांना आमदार भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे,ज्येष्ठ नेते प्रतापराव पाटील,सचिन सपकळ, शुभम निंबाळकर यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्ही सर्वजण शेतकरी कुटूंबातील असल्याने तुम्हाला सामान्य जनतेच्या प्रश्नांची निश्चितपणे जाणीव असेल,त्यामुळे तुमच्या हातून गोर-गरिबांची सेवा घडावी,आशी अपेक्षा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्ती केली.

 महाराष्ट्र लोक लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा नुकताच निकाल लागला असून यामध्ये इंदापूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज भरणेवाडी ता.इंदापूर येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून घवघवीत यश संपादन केले आहे,याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेके आहे.यातील अनेकांनी कोणत्याही बाह्य शिकवण्या न लावता घरच्या घरीच अभ्यास करून गुणवत्ता यादीमध्ये नाव झळकवलेले आहे,हे निश्चितपणे कौतुकास पात्र असून आपण सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने आज त्याचा फायदा असंख्य होतकरू विद्यार्थ्यांना होत असल्याने याचे खूप मोठे समाधान वाटत असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.तसेच तुमच्या या यशामध्ये आई-वडील,शिक्षक,गुरुजनवर्गासह समाज्याचाही मोलाचा वाटा आहे, याची जाणीव सदैव मनामध्ये ठेवून तुम्ही ज्या खुर्चीवर बसणार आहात, त्या खुर्चीचा वापर गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कराल ही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पदी यश संपादन केलेल्या ज्योती शिंदे (काटी),अभिजीत ढेरे (पळसदेव),करिष्मा वणवे (तावशी), अजयसिंह भाळे(खोरोची),अक्षय शिंदे (बोरी)आणि रणधीर रोकडे (निरवांगी) या गुणवंतांना आमदार भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे,ज्येष्ठ नेते प्रतापराव पाटील,सचिन सपकळ, शुभम निंबाळकर यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *